शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

राज्यभरात रत्नागिरीचा ठसा : नऊ पंचायत समित्यांकडून ३ हजार ६६ हेक्टरवर लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:50 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ ...

ठळक मुद्देफळबाग लागवडीत रत्नागिरी जिल्हा परिषद अव्वल

रत्नागिरी : जिल्ह्यात यंदा रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या फळबाग लागवडीत रत्नागिरीजिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या फळबाग लागवडीपैकी जिल्हा परिषदेने ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली असून, उर्वरित क्षेत्रावर कृषी विभागातर्फे लागवड करण्यात आली आहे. एवढ्या क्षेत्रावर लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानुसार प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, ऐनवेळी रोपे कमी पडल्याने केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. यावर्षी गतवर्षीचे उरलेले ४,७८८ हजार आणि यावर्षी नव्याने ७,७१०  मिळून एकूण १२,४९५ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून खासगी रोपवाटिकांतून १६ लाख आणि शासकीय रोपवाटिकांतून व कृषी विद्यापीठातून ८ लाख अशा  २४ लाख रोपांची उपलब्धताही करण्यात आली.

जिल्ह्यात कृषी विभागाला एकूण ४,५०७ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले तर पंचायत समित्यांना ४,३८१ हेक्टर इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.  फळबाग लागवडीचा आढावा नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला. आत्तापर्यंत ५,७१९ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून अधिक लागवडीची अपेक्षा असतानाच जिल्हा परिषदेच्या नऊही पंचायत समित्यांनी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम केले आहे. जिल्हा कृषी विभागाने  २,३५३ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे तर नऊ पंचायत समित्यांकडून ३,०६६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि खेड या तीन पंचायत समित्या अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. तर दापोली, चिपळूण आणि लांजा कृषी विभाग हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

राज्यात जिल्हा परिषदेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड करणारा रत्नागिरी जिल्हा एकमेव आहे. या लागवडीसाठी पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांनी विशेष प्रयत्न केल्याने यावर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

 

यावर्षी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी मेहनत घेतल्याने महाराष्ट्रात सर्वाधिक फळबाग लागवड करणारी रत्नागिरी जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.

- डॉ. जयकृष्ण फड, प्रभारी उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना विभाग, रत्नागिरी.

टॅग्स :zpजिल्हा परिषदRatnagiriरत्नागिरी